हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये मित्रांनो आज आपण आकस्मिक रोग व त्यांचे घरेलु उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये मित्रांनो आज आपण आकस्मिक रोग व त्यांचे घरेलु उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
आकस्मिक रोग व त्यांचे घरेलु उपचार
लचक भरणे
- हात किंवा पाय आत कोठेही लचक भरलेले असल्यास सरसोचे तेल लावून त्यावर हळदीची पूड शिंपडून त्याला कापडाने पांघरून घ्यावे. एका फडक्यात मिठाची पुरचुंडी बांधून त्याने गरम करून अर्धा तास शेक करावा.
जखम होणे
- साध्या तंबाखू खाण्याचा भिजलेला चुना कालवून जखमेत भरावा. वरून पट्टी बांधून घ्यावी. यामुळे जखमेतून होणारा रक्तस्त्राव बंद होतो. शिवाय जखम पिकत नाही व लवकर आराम येतो.
- कातडे सोलले गेले असल्यास किंवा खरचटले गेले असल्यास झेंडूची पाने बारीक वाटून त्याच्या गोळ्या तयार करून जखमेवर बांधाव्या रक्तस्राव थांबतो.
- धारदार वस्तूने शरीरावर जखम झाली असेल व रक्त वाहत असेल तर चहा पत्ती तळहातावर तंबाखू सारखी मळून जखमेवर लावावी. याच्याने जखम पिकत नाही व लवकर आराम येतो.
भाजणे
- आगीत भाजलेल्या जागेवर लगेच चून्याचे निथळलेले पाणी व खोबरे तेल समप्रमाणात कालवून लावल्याने जळजळ लगेच थांबते व फोड येत नाही. दिवसातून दोन-तीन वेळा लावावे.
- भाजलेल्या जागेवर लगेच ग्लिसरीन लावल्याने छाले पडत नाही. कातडी लाल होत नाही व त्रास कमी होतो.
- भाजलेल्या जागेवर कच्चा बटाटा वाटून लावावा. उन्हाने कातडे भाजलेले असल्यास बटाट्याचा रस लावल्याने आराम पडतो.
- कच्या गाजराला वाटून लावल्याने पण आराम येतो.
पायात फोड किंवा छाले
- नवीन बुट घातल्याने पायात फोड किंवा जखम झाली असल्यास जांभळाच्या बिया पाण्यात उगाळून लावल्याने जखम बरी होते.
मूर्छा (शुद्ध हरपणे)
काळजी, भीती, श्रम इत्यादीमुळे झालेल्या मुर्छेवर खालील उपाय करावेत,
- रोग्याच्या चेहर्यावर थंड पाण्याचे शिंतोडे मारावे. डोक्यावर थंड पाणी टाकावे. वारा करावा. कबरेतले कपडे सैल करावे. कांद्याचा रस 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीतून सोडावा.
- संपूर्ण शरीरावर गोडेतेलाची मॉलिश केल्याने मूर्छा दूर होतो.
अम्ला मुळे भाजणे
- भिजलेल्या चुन्यांचे पाणी व नारळाचे पाणी 10 - 10 मि.ली , घेउन एक बाटलीत भरून ठेवावे, त्यांत 1 ग्रॅम पेपरमिंट व 1 ग्रॅम भीमसेनी कापूर मिसळून चांगले हलवावे, हे मिश्रण अम्लामुळे भाजलेल्या कातडीवर दिवसातून 3 वेळा लावावे. याच्यामुळे जळजळ शांत होते व जखम होणे व डाग पडण्याची शक्यतापण कमी होते.
महत्त्वाची सूचना :- अम्लामुळे जर जखम फार खोल झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा , जखम बरी करण्यासाठी पोटातुन औषधेही घ्यावी लागतीत.
पायात कांच जाणे
- ज्या जागेवर कांचेचा तुकडा गेला असेत तेथे हिंगाचे पाण्यात मिश्रण तयार करून लावावे. कांच आपोआप बाहेर येईल. पायात काटा गेला असल्यास पण हा उपाय फायदेशीर आहे.
तर मित्रांनो वर सर्व आकस्मिक रोग व त्यांचे घरेलु उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.
आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.
आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम.
Post a Comment
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा